Tuesday 25 September 2012

खरं प्रेम म्हणजे

खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां होते 
जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात-
 मनाने, शरिराने! कायमचे..!! खरं प्रेम म्हणजे 
दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे. 
खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे. 
खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे. 
खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे. 
खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे. 
खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं. 
खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे. 
खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे. 
खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे. 
खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं. 
खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं. 
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे. 
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे. 
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे. 
खरं प्रेम म्हणजे … तू अणि मी, कायम जवळ असणे..!!

Friday 21 September 2012

प्रपोज

कसं सांगू तुला ,
झालाय किती आतुर ,
तुझ्यासाठी हा जीव माझा
सुचत नाही दुसरं काही
तुझयाशिवाय मला,
म्हणूनच विचारतोय तुला,
सांग ना माझी होशील का ?
चोहीकडे तूच आहेस ,
होतो असा भास मला
प्रत्येक चेहर्यात दिसतो ,
फक्त आणि फक्त तुझाच चेहरा
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग ना माझी होशील का ?
शब्दच फुटत नाही तोंडातून
पाहतो जेव्हा तुला
धडधडायला लागतं काळीज माझं,
बघताच समोर तुला
म्हणूनच विचारतोय तुला,
सांग ना माझी होशील का ?
केलंस घायाळ तू ,
पहिल्याच नजरेत मला
वाटत होतं तेव्हा ,
तिथच करावं प्रपोज तुला
म्हणूनच विचारतोय तुला ,
सांग ना माझी होशील का ?
इवलसं काळीज हे ,
घाबरतं तुझ्या नकाराला
भावना माझ्या व्यक्त करण्यासाठी,
लिहिल्या या चार ओळी तुला
आवडल्या तर........आवडल् या तर ,
सांग ना माझी होशील का ?

Friday 14 September 2012

माझं प्रेम

"मी ही कधी कुणाच्या प्रेमात होतो,
माझ्यावर ही कुणाचं नियंत्रण असायचं..
नकळत का होईना मी ही हरवून जायाचो,
कधी कधी तर वेळेचाही भान विसरून जायचो..
दिवसभराच्या कामात एकदा तरी फोन करायचो,
हळूचं का होईना पण I Love You म्हणायचो..
नाहीचं Phone तर Miss Call तरी द्यायचो,
रात्री तशी सगळ्यांची झोपण्याची वेळ..
पण मी मात्र sMs-sMs खेळत राहायचो,
सगळंच आता भूतकाळात विरून गेलं..
माझं प्रेम माझ्यापासून दुरावून गेलं,
जाता जाता मला खूप वेदना दिल्या..
पण ?????
माझं प्रेम कधी व्यर्थ नाही गेलं..
जाता जाता खूप काही शिकवून गेलं,
किती तरी नाती आपण गृहीत
धरतो तिचं अस्तित्वचं आपण Assume करतो..
समजत नाही कधी मोल नात्यांचं,
आणि मग दुःख करतो ते दुरावल्याचं..
आज खरचं समाधान वाटतंय,
की मी ही कधी प्रेम केलं होतं..
खरंच माझं प्रेम व्यर्थ नव्हतं,
जाता जाता मला जगण्याच्या जवळ
घेऊन गेलं...."

आपण जिच्यावर प्रेम करतो,

आपण जिच्यावर प्रेम करतो,
तिच्या आठवणीत नेहमी झुरतो..
डोळ्यासमोर निरागस चेहेरा तिचा येतो,
फक्त एकदाच भेटून जा एवढेच सांगून जातो..
दूर राहून कधी प्रेम कमी होत नसते,
कारण ती आपल्या हृदयात असते..
प्रेम कमी होऊ नये म्हणून महिन्यातून
एकदातरी भेट होते,
क्षणभर भेटते आणि अमाप प्रेम देऊन जाते..
दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचा चेहेरा डोळ्यासमोर
येतो, स्पर्श करायला हात तिच्या जवळ सरतो...♥

Sunday 2 September 2012

मी तुझी वाट पाहत राहील.......... ♥♥♥

गुन्हा फक्त इतकाचं झाला,
कि मी तुझ्यावर प्रेम केलं..
माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं..
प्रेम मी करतचं राहिले,तू फक्त व्यस्त राहिला..
मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिली ..
आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे,
तू मात्र तिथेचं राहिलीस..
आठवणी मात्र येत असतात, मी अश्रू पुसत राहतो ..
जिथे असशील तीथे खूप सुःखी राहा,
आणि मी तुझी वाट पाहत राहील.......... ♥♥♥

का कळेना I Miss u ♥♥♥

कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ? का कळेना. I Miss u

मुळात अपेक्षाच करु नये अशा पण.... तरीही आस लागतेच ना ?


हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी....,

तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना...??? का कळेना. I Miss u

लाख झाला असेल मनाचा दगड....,

तरीही आठवणींनी त्याला पाझर फुटतोच ना....??

जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना ...??

या सगळ्यातनं हाती उरायचे असते शून्य...फक्त एक शून्य..

पण..... तरीही जीव जडतातच ना .....?? ♥♥♥

का कळेना. I Miss u

अजूनही त्याच वाटेवर आहे

अजूनही त्याच वाटेवर आहे , जिथे तू मला सोडून गेली होतीस

अजूनही त्याच वाटेवर आहे , वाट तुझी पाहत आहे ........

कधी विचार सुद्धा केला नव्हता

कि तू मला सोडून जाशील...

पण या कलीयुगात मात्र उलटेच घडते .

आता आठवणी हृदयाशी जपून त्यातच पाहतो मी तुला ....

खात्री आहे मला नाही येणार तू परत

तरी ही वाट तुझीच पाहतोय ....

त्याच वाटेवर..........

त्याच वाटेवर....................

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

एखाद्या वळणावर माझी वाट पाहणारी

माझ्यासाठी थांबलेली

माझ्या भेटीसाठी आसुसलेली...

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी

माझे एकाकीपण संपवणारी

माझ्या सुखात सहभागी होणारी

माझे दुखः आपले मानणारी

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...

मला मी आहे तसेच स्वीकारणारी

मला समजून घेणारी

सावली सारखी सतत

माझ्याबरोबर राहणारी

माझ्या साठीच जगणारी'

असेल कोणीतरी माझ्याचसाठी खास...
प्रेमासाठी भुकेलेले खुपजण असतात,.
पण प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं.
खुप भाग्यवान असतात अशी मानसं,
ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी तरी या जगात असतं.....
प्रेमासाठी भुकेलेले खुपजण असतात,.
पण प्रत्येकाला प्रेम मिळत नसतं.
खुप भाग्यवान असतात अशी मानसं,
ज्यांच्यावर प्रेम करणारं कुणी तरी या जगात असतं.....

अचानक झालेले बदल

"तुळशी" ची जागा आता "Money Plant" ने घेतलीय...

"काकी" ची जागा आता Aunt ने घेतली...य...

वडील जिवंतपणिचं "डैड" झाले,

अजुन बरचं काही आहे आणि तुम्ही आत्ताचं Glad झाले....??

भाऊ "Bro" झाला आणि बहीण "Sis".........

दिवसभर मुलगा CHATTING चं करत नाही तर

रात्री झोपताना Mobile वर SETTING पण करतो....

दुध पाजणारी आई जिवंतपणीचं "Mummy" झाली...

घरची भाकरं आता कशी आवडणार हो...

५ रु. ची Maggi आता किती "Yummy" झाली...

तुझी आठवण ........

तुझी आठवण

तुझ्याशी बोलून बर वाटत.

तुझ्या सहवासात खेळावस वाटत.

तुझ्या विचारांच्या समुद्रात दुबावस वाटत.

तुझ्याशी विनाकारण भांडावसवास वाटत.

तू रुसलीस का मुद्दाम तुला चीडवावस वाटत.

पण खरच तू दररोज आनंदी राहवअस मनाला वाटत.

नको जूस मला कधी सोडून

कारण तुला बगून अजून जगावस वाटत....

" I LOVE YOU "

प्रत्येकालाच गरज असते एका साथीदाराची,

प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगात रंगवण्यासाठी

त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी म्हणूनच ........

असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ

जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर...

एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा

" I LOVE YOU "

कुणीतरी असलं पाहिजे…

कुणीतरी असलं पाहिजे…
संध्याकाळी घरी गेल्यावर आपल्यासाठी दार उघडायला..
सकाळी घरातून बाहेर पडताना “लवकर ये” असं सांगायला…
मीटिंग मधून बाहेर आल्यावर “back” असा मेसेज टाकायला…
“कंटाळा आलाय” हे कंटाळवाणं वाक्य कंटाळा येईपर्यंत सांगायला…
इच्छित स्थळी पोचल्यावर “सुखरूप पोचले” चा फोन करायला….
ट्रेक साठी जाताना “फार भिजू नकोस” असं बजावायला…
उशीर होत असेल, तर “जेवून घ्या” असं सांगायला…
कितीही वेळा सांगितलं तरीही आपल्यासाठी जेवायचं थांबायला…
घरी आल्यावर आज काल झालं ते सगळं सगळं सांगायला…
कटकटींचं मळभ हटवून मन स्वच्छ करायला…

असेल कोणीतरी माझ्याचसाठी

♥..असेल कोणीतरी एखाद्या वळणावर

माझीही वाट पाहणारी

माझ्याचसाठी थांबलेली

माझ्या भेटीसाठी आसुसलेली..♥ ♥..

माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी

माझं एकाकीपण संपवणारी

माझ्या सुखात सहभागी होणारी

माझं दु:ख आपले मानणारी

मला समजुन घेणारी....♥ ♥..

सावली सारखी सतत माझ्याबरोबर राहणारी

केवळ माझ्याचसाठी जगणारी

आणि माझ्याचसाठी मरणारी...♥ ♥..

असेलही कदाचित...! ♥

आज परत तुझी आठवण आली

आज परत तुझी आठवण आली
अचानक मी एकटाच हसलो
मनात झाली गर्दी विचारांची
त्यात मी स्वतःला हरवुन बसलो

वेळ जतांना पुढे
स्मृतींची घड्याळ मागे फिरली
जावून थांबली त्या ठिकाणी
जिथे तू पहिल्यांदा भेटली

तुझ हसण, तुझ रूसण
कधी ओठांनी, कधी डोळ्यांनी बोलण
आठवत मला आजही ते
नजर चोरून तुला बघण

आज तुझी आठवण दरड बनुण कोसळलि
तिला अडवुही शकलो नाही, मी पळू ही शकलो नाही
छातीत गुदमरत गेला प्रतेक श्वास
मी जागूही शकलो नाही, मी मरुही शकलो नाही

तुझया आठवणींना देत उजाळा
आज ही रात्र जागली आहे
तुझयाच स्मृतीचा गंध .उण
ही रातराणी फुलली आहे

डोळयात आले बनुण पाणी
आज तुझे स्मरण आहे
सहज वाहून जातील कसे
पापण्यांचे मी केले धरण आहे

आठवणींची अशी शीदोरी
सरता न सरणारी
पुरूनही उरणारी
आशा तुझ्या आठवणी.....

आई

आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥
कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥

कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥
कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥
असेन जर मजला, मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥

प्रेम तुझं खरं असेल तर

प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

नाते तुझे-माझे

नाते तुझे-माझे 
स्वप्नी माझ्या येऊन तू 
फक्त गप्पा मारत बसतेस 
तर कधी मिठीत येऊन 
अचानक निरोप घेऊन जातेस ... 
गप्प राहा ग आता किती बडबड करतेस ... 
सुख - दु:ख वाटताना माझ्यावर का तू रुसतेस? 
दिसलो नाही एकदा जरी अबोला माझ्याशी धरतेस 
आयुष्याची गणितं मांडताना मैत्री मात्र विसरतेस ...!!!
 माझ्याविना तू , तुझ्याविना मी कधी ना राहू शकलो तरीही
 या गोंडस नात्याला प्रेम नाही म्हणू शकलो ??? बोहल्यावर चढलीस
 तेव्हा मात्र नयनी दोघांच्या अश्रू तरळले भाव नजरेतील सावरताना लोकांनीही 
पहिले ... मैत्री कि प्रेम म्हणावे कधीच नाही कोणा कळले नाते तुझे-माझे .. असे कसे हे जगावेगळे ... 

घड्याळ आयुष्याचे..... मैत्रीचे........

"घड्याळा मध्ये तीन काटे असतात, 
ते तीनही काटे एकमेकांना एका तासा 
मध्ये फक्त एकदाच भेटतात ... 
आणि ते सुद्धा फक्त एका सेकंदा साठीच,
पण तरी सुद्धा ह्या एका सेकंदाच्या गोड 
भेटी साठी हे काटे एकमेकांना धरून राहिले आहेत, 
नाही का ? पण आपली मैत्री अशीच आहे, 
आपण एकमेकांना कधीतरीच भेटतो, पण तरीही 
मनाने आपण एकमेकांना धरून राहिलो आहोत" ..........
त्या गोड भेटीसाठी आणि त्या गोड आठवणीसाठी ♥ ♥

It's a love................this is for you

It's a love............... 
फक्त तु नकळत माझ्या जीवनात आलीस तु,
काय आहे तुझ्यात? आपलसं केलस तु. 
माझ्या या वेड्या मनाला धीर दिलास तु, 
वेडेपणात माझ्या मला साथ दिलीस तु. 
प्रत्येक क्षणात सदैव मजसोबत असतेस तु,
रहायचे आहे जिच्याबरोबर आयुष्यभर
ती आहेस फक्त तु, 
नाही ना जाणार केव्हाच सोडून?
सांग ना तु,
नाही होणार तुझ्याशिवाय कुणाचाच हे जाण फक्त तु..
                                          ...............this is for you.

स्वप्न

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात,
ती फक्त पहायची असतात,
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात,
पण स्वप्न पुर्ण झालं नाही
तर रडायचं नसतं,
रंग उडाले ... म्हणुन चित्र फाडायचं नसतं,
फक्त लक्षात ठेवायच असतं
सर्वच काही आपल नसतं,
आपल्या दुःखात (कदाचित)
दुसऱ्याच सुख असतं..

आयुष्य असाच जगायचं असत....!!!

आयुष्या कडून कधीच काही
मागायचं नसत
नशीब सोबत नसल तरी
हिसकावून घ्यायचं असत.
कोणी प्रेम केल नाही म्हणून
प्रेमाला खोट ठरवायचं नसत
आपल्याला मिळाल नाही तरी
मुक्त हस्ते सर्वांना वाटायचं असत.
हातावरच्या रेषांनी सोबत सोडली तरी
आयुष्य असाच जगायचं असत....!!!